Farmer Loan | ‘या’ राज्यात शेतकऱ्याना व्याजमाफी; महाराष्ट्रात कधी होणार वाचा सविस्तर माहिती

Farmer Loan |  देशभरातील शेतकरी सध्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी करण्यात यावी यासाठी राजधानी दिल्ली येथे लाखोंच्या संख्येने आंदोलन करत आहे. अशातच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. हरियाणा सरकारने यावर्षीच्या अर्थसंकल्पनामध्ये आपल्या शेतकऱ्यांना भेट दिली आहे.

Farmer Loan

राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यानी राज्याचा अर्थसंकल्पनामध्ये हा निर्णय घेतलेला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना तुम्ही घेतलेल्या कर्जावरील सर्व कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे तसेच शेतकऱ्यांना कर्जावरील दंडाचे रक्कम देखील सरकार करून भरली जाणार असल्याचे यांनी सभागृहात अर्थसंकल्पनामध्ये सांगितले आहे.

महाराष्ट्रात प्रति शेतकरी 1.58 लाख रुपये कर्ज (Farmer Loan)

राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँकेचे आकडेवारीनुसार सद्यस्थितीत पंजाब मधील शेतकऱ्यांवर सर्वाधिक कर्ज आहे. तिथे शेतकऱ्यांवर 2.95 लाख रुपये इतकी आहे. तर महाराष्ट्रात देखील खातेदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून महाराष्ट्रात प्रती शेतकरी 1.58 लाख रुपये इतके कर्ज आहे. महाराष्ट्रवरील शेतकऱ्यांची कर्ज ची रक्कम 1 लाख 61 हजार 471 कोटी रुपये इतकी आहे.

त्यामुळे राज्यातील शिंदे फडणवीस सरकार या अर्थसंकल्पनामध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी देखील कर्जबाबत काहीतरी दिल से आशा राज्यभरातील शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. निवडणुकांचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवू राज्यातील सरकार खरंच शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार का याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.

तसेच हरण्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खटर यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करण्याचे वेळी ही कर्जमाफीची घोषणा केली असून याचा हरण्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. अर्थसंकल्प सादर करत असताना त्यांनी सांगितले की मी देखील शेतकऱ्यांचा मुलगा असून मला शेतकऱ्यांचे दुःख समजते. मी देखील शेतकऱ्यांमध्ये कधीतरी नांगर हक्काला आहे. त्यामुळे या वेळेचा अर्थसंकल्पनात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top