Dushkali Anudan | यंदा राज्यामध्ये कमी पाऊस झाल्यामुळे राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून योग्य ते निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मदत देण्याचे पाऊल उचलले आहे. शेती करत असताना शेतकऱ्यांना अनेक अशा संकटाचा सामना करावा लागतो. दुष्काळ, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असते. परंतु येत्या काळामध्ये शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मदत दिली जाते. व ही मदत शेतकऱ्यांना एका हंगामापुरते एका वेळेस पुरते त्यासाठी शासनाच्या माध्यमातून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने निविष्ठा अनुदान (Drought Subsidy) स्वरूपामध्ये देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून इतर मान्य बाबींकरिता…